महाराष्ट्र ग्रामीण

CHANDRAPUR | पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचा धोका, शेतकऱ्यांचे संकट वाढले

CHANDRAPUR | पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचा धोका, शेतकऱ्यांचे संकट वाढले

विदर्भात यंदा मान्सूनला उशीर होत असल्याने खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे. पेरणीची योग्य वेळ सुरू झाली असली तरी बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या तणावात आहेत.ही

शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या असल्या, तरी पावसाचा आधार न मिळाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर तालुक्यातील स्थानिक शेतकरी संदीप पाटील म्हणाले, पावसाशिवाय सोयाबीन पेरायचे नाही. पेरणी घाईने केली, तर नासाडी होणार.

 

आज-उद्या पाऊस न पडल्यास १००-१२५ टक्के खत वापरून ‘दुबार पेरणी’ करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यात उत्पादनात घट आणि खर्चात वाढ होणार आहे.

 

शेती तयार करताना प्रति एकर १५,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. पण मजूर व ट्रॅक्टर वेळेवर मिळत नसल्याने अडचणीत भर पडत आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने केवळ पेरणीच नव्हे, तर पीक वाढीवर आणि उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

शेतकरी वर्ग शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा करत असून, हवामान खात्याकडूनही अधिक अचूक अंदाज दिला जावा, अशी मागणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button