महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

रामटेक हादसा : कुलगुरू हरेराम त्रिपाठी, पत्नी व चालकाचा दुर्दैवी अंत – तीन जीव घेतलेला भीषण अपघात

नागपूर/रामटेक : रामटेक तालुक्यातील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी यांच्या अपघाती निधनानंतर आता या दुर्घटनेतील गंभीर जखमी वाहनचालक वैभव मिश्रा याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला आहे.

ही घटना 23 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता घडली. डॉ. त्रिपाठी पत्नी व चालकासह मऊ–कुशीनगर महामार्गावरून आपल्या मूळगावी देवरिया येथे जात होते. या दरम्यान उत्तर प्रदेशातील दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या ब्लॅक इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या धडकेत कुलगुरू दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाला होता.

गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यानेही अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी इनोव्हा कार स्वतः कुलगुरू डॉ. त्रिपाठी चालवत होते. या दुर्घटनेमुळे शिक्षणक्षेत्रासह नागपूर आणि उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button