Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

उड्डाणपुलाच्या गढ्यात पडून तरुणाचा मृत्यू; महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

नागपूर :

आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील डिप्टी सिग्नल परिसरात पाण्याच्या तळ्यांमुळे आणि गढ्यांमुळे एक 22 वर्षीय तरुणाचा जीव गेला. मृत तरुणाचे नाव महेन्द्र फटिंग असे असून तो स्कूटरवरून घरी परतत असताना अपघातग्रस्त झाला.

 

प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागपूर महानगरपालिकेचा ड्रेनेज सिस्टम पूर्णपणे कोलमडला. नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आणि रस्ते नदीसारखे दिसू लागले. याच दरम्यान, डिप्टी सिग्नल परिसरात सात वर्षांपासून सुरू असलेल्या पुलिया बांधकामामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज बांधणे अशक्य झाले.

 

याच कारणामुळे महेंद्रला खड्डा न दिसता त्याची दुचाकी थेट पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शिरली आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

 

महेंद्रच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी कामावर गेलेला हा तरुण सायंकाळी घरी परतलाच नाही. पावसाचे पाणी आणि प्रशासनाची निष्काळजीपणा यामुळे एका कुटुंबावर काळाचे सावट आले.

स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत सांगितले की,

“महानगरपालिकेच्या ड्रेनेज व्यवस्थेची दयनीय अवस्था, अपूर्ण पुलिया बांधकाम आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button