महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचा हल्लाबोल; नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन, नेते–विधायकही सहभागी

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईत मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून, त्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी संघाच्या अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनात नागपूर व परिसरातील शेकडो ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध राजकीय पक्षांचे नेते व आमदारांनीही उपस्थिती लावली. संविधान चौकात ओबीसी समाजाने एकजूट दाखवत “ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही”, “आरक्षणावर डाका चालणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठा समाजाला न्याय देण्यास ओबीसी समाज कधीच विरोधी नाही. पण ओबीसींचे हक्क, त्यांचे आरक्षण यावर कुणी गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध होईल. राज्य सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करून गोंधळ दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

नागपूरमधील हे आंदोलन पाहता, पुढील काही दिवसांत ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय समीकरणे आणखी ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button